बाॅम्बस्फोट खटल्यातील आरोपीला तिकीट देणं हा लोकशाहीवरील हल्ला असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं. सोमवारी राष्ट्रवादीचा २० वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी केलेल्या भाषणात पवार यांनी देशातील बदललेल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं.
यापैकी काही खासदारांवर खटलेही दाखल आहेत. यात गंभीर खटले असलेली एक व्यक्ती मध्य प्रदेशमधून निवडून आली आहे. मालेगाव बॉम्बस्फोटाचा खटला असो किंवा इतर गंभीर खटले असणाऱ्यांना तिकीट देणं कुठल्याही राजकीय पक्षाला न शोभणारी गोष्ट आहे.
खटले २ प्रकारचे असतात. महागाईच्या विरोधात मोर्चा काढल्यावर दाखल झालेल्या राजकीय खटल्याचा प्रत्येक कार्यकर्त्याला अभिमान असतो. कारण तो जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी केलेला असतो. मात्र बॉम्ब स्फोटातील आरोपीला तिकीट देणं हा लोकशाहीवरील हल्ला आहे, असं पवार म्हणाले.
ईव्हीएम घोटाळ्याबाबत पवार म्हणाले, मतदार ज्या ठिकाणी मतदान करतात, त्या ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटमध्ये काहीच घोटाळा होत नाही. परंतु ईव्हीएम जेव्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या हातात जाते. तेव्हा मतमाेजणीच्या वेळेस काहीतरी गडबड होते. त्यामुळे आपण या प्रकरणाच्या खोलात जाणार आहोत.
हेही वाचा-
विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम नकोच- प्रकाश आंबेडकर
प्रफुल्ल पटेल यांच्या अडचणींत वाढ, ईडीने दुसऱ्यांदा बजावलं समन्स