मतदार यादीत हजारो बोगस नावं; शिवसेना, बविआचा आरोप

पालघर लोकसभेच्या जागेसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. या ठिकाणी बहुजन विकास आघाडी आणि शिवसेनेत मुख्य लढत होणार आहे. दरम्यान, मतदानापूर्वी मतदार यादीमध्ये हजारो बोगस नावं असल्याचा आरोप शिवसेना आणि बविआकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे करण्यात आला आहे.

६८ वेळा महिलेचं नाव

मतदार याद्यांमध्ये ६० हजार मतदारांची नावं दोनवेळा आल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीकडून करण्यात आला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेनंही ५६ हजार मतदारांची नावं दोन वेळा आल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. तर दुसरीकडे एका महिलेचं नाव ६८ वेळा आल्याचंही निदर्शनास आलं आहे.

दरम्यान, शिवसेनेनं पालघर मतदारसंघात मतदारयादीची चिरफाड करून बोगस मतदार तयार केल्याचाही आरोप केला आहे. या यादीत ५६ हजार मतदारांची दोन वेळा तर इतर हजारो मतदारांची तीन, चार, पाच वेळा नावे आली आहेत.


हेही वाचा -

दिग्गजांचं भवितव्य आज मतपेटीत बंद होणार; मतदारांमध्येही उत्साह


पुढील बातमी
इतर बातम्या