महालक्ष्मी रेसकोर्सनंतर मुंबईच्या ३५० बेस्ट बसस्थानकाचे होणार सुशोभीकरण

महालक्ष्मी रेसकोर्स (Mahalaxmi Race Course) येथे एका आगळ्यावेगळ्या बसथांब्याची रचना नमुना दाखवण्यात आली. या बसथांब्याला मुंबईकरांची पसंती मिळाल्यामुळे बेस्ट उपक्रमाने अशाच प्रकारचे 350 बसथांबे विकसित करण्याचे काम सुरु केले आहे.

सदर कामासाठी लागणारा निधी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या निधीतून उपलब्ध होणार आहे. याशिवाय आणखी १००० बसथांब्यांचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे

अशाप्रकारे येत्या 6 ते 8 महिन्याच्या कालावधीत मुंबईतील जवळपास सर्वच बसथांबे पर्यावरणस्नेही आणि आकर्षक स्वरुपाचे असतील जेणेकरुन सदर बसथांब्यांवर बसगाडयांच्या प्रतिक्षेत थांबणा-या प्रवाशांना एक सुखद अनुभव बेस्ट उपक्रमाद्वारे देण्याचा विचार आहे.

मुंबईच्या सौंदर्यात भर घालणा-या या उपक्रमाच्या मदतीसाठी विविध कॉर्पोरेट हाऊसेस, बँका, उत्पादक संस्था, प्रसार माध्यम संस्था, तसेच अन्य व्यवसाय संस्थांनी त्यांच्या कार्पोरेट •सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंडाद्वारे या नवीन बसथांब्याच्या बांधकाम व देखरेखीसाठी सहकार्य करावे असे बेस्ट उपक्रमाद्वारे आवाहन करण्यात येत आहे. अशा व्यवसाय संस्थांना बेस्ट उपक्रमाद्वारे जाहिरात दरांमध्ये सवलत देण्यात येणार आहे.


हेही वाचा

बेस्टच्या चलो अॅपद्वारे वीज बिल भरा ऑनलाइन

पश्चिम रेल्वेवर वातानुकूलित लोकलच्या आणखी ८ फेऱ्या, ‘या’ तारखेपासून सुरू

पुढील बातमी
इतर बातम्या