टोलमाफीमुळे सायन-पनवेल सुसाट

मुंबई - सध्या टोल नाका बंद असल्यानं सायन-पनवेल हाय वे पूर्णपणे मोकळा असून टोलच्या पैशासह वेळेची देखील मोठी बचत होत असल्यानं वाहन चालकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सुट्ट्या पैशांच्या तुटवड्यामुळे 14 नोव्हेंबरपर्यंत शासनानं राज्यातील सर्वच टोलनाके बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. 500 आणि एक हजरांच्या नोटा बंद झाल्यानंतर सुट्टे पैसे नसल्यानं टोल नाक्यावर वाहनाच्या मोठ्या रांगा लागत होत्या. वाशी टोल नाक्यावर देखील अशीच परिस्थिती होती.

पुढील बातमी
इतर बातम्या