आयकर परतावा भरण्यास ३० जूनपर्यंत मुदतवाढ

देशभरात कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने सुरू आहे. देशासमोर मोठं संकट निर्माण झालं आहे. कोरोनाला अटकाव करणं हे मोठं आव्हान सध्या सर्व राज्यांसमोर आहे. या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत काही घेषणा केल्या. यानुसार आता आयकर परतावा भरण्याची मुदत ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.

पत्रकार परिषदेत सितारामन म्हणाल्या की, आयकर परतावाबाबत ‘विवाद ये विश्वास’ या योजना तयार करण्यात आली असून त्याची मुदत ३० जूनपर्यंत ठेवण्यात आली आहे. त्यानुसार, नोटीस, अपिल, रिटर्न फायलिंग ३० जून पर्यंत करता येणार आहे. तसंच आर्थिक वर्ष २०१८-१९ ज्यांनी रिटर्न फाईल केलेलं नाही त्यांना आता ३१ मार्चऐवजी ३० जून २०२० पर्यंत रिटर्न फाइल करता येईल. याशिवाय उशीरा रिटर्न फाईल करणाऱ्यांसाठी दंड १२ टक्क्यांवरुन ९ टक्के करण्यात आला आहे. याशिवाय मार्च, एप्रिल, मे महिन्याचा जीएसटी रिटर्न भरण्यासाठी मुदतही वाढवून 30 जून करण्यात आली आहे.

 

इतर घोषणा

  • ३० जून २०२० पर्यंत २४ तास कस्टम क्लिअरन्सची सुविधा उपलब्ध राहिल
  • ५ कोटींपर्यंत टर्नओव्हर असलेल्या कंपन्यांसाठी जीएसटी रिटर्न फाइल करण्यासाठी उशीर झाल्यास दंड आकारण्यात येणार नाही.
  • कॉर्पोरेट्सच्या संचालक मंडळाच्या बैठका ६० दिवसांसाठी पुढे ढकलता येतील.
  • टीडीएसवरचा व्याज १८ टक्क्यांवरुन ९ टक्के केला जाणार आहे.
  • मार्च, एप्रिल आणि मे पर्यंतचा जीएसटीचा भरणा ३० जूनपर्यंत करता येणार आहे.
  • करोनाशी संबंधीत कामांसाठी देखील आता सामाजिक कृतज्ञता निधी (CSR) वापरता येणार आहे.

हेही वाचा -

राज्यसभेची निवडणूक पुढे ढकलली, पण महाराष्ट्रातील 'हे' सदस्य आले बिनविरोध निवडून

अन्यथा भाजीपाला मार्केटही बंद करावं लागेल- अजित पवार


पुढील बातमी
इतर बातम्या