मुंबई (mumbai) सह मुंबई महानगर प्रदेशातील गाई (Cows)आणि म्हशींचे (buffalo) गोठे-तबेले डहाणू (dahanu) तालुक्यातील दापचरी येथे हलवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने (bombay High Court) गुरुवारी राज्य सरकारला दिले आहेत. गोठे-तबेले हलवण्याबाबत निर्णयाप्रमाणे आवश्यक कार्यवाही सुरू करून संदर्भातील कृती अहवाल १२ जूनला सादर करण्याचे निर्देशही कोर्टाने दिले.
मुंबई (mumbai तील विविध भागांत जवळपास ३६ हजार गुरांचे तबेले आहेत. या तबेल्यांमुळे प्रदूषणाचा आणि नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे, असे निदर्शनास आणणारी याचिका 'जनहित मंच 'ने २००५ दाखल मध्ये केली होती. या याचिकेची गंभीर दखल उच्च न्यायालयाने घेत हे गोठे मुंबईबाहेर हलवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सर्व तबेले दापचरी येथे हलवण्याचा निर्णय घेतल्याचे सरकारने २००७ मध्येच न्यायालयात सांगितले होते. मात्र, १३ वर्ष यावर काहीच कार्यवाही झाली नाही. त्याची गंभीर दखल घेत न्या. सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाने संबंधित विभागांच्या सचिवांची विशेष समिती स्थापन करून बैठका घेण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर याप्रश्नी न्यायालयाला सहाय्य करण्यासाठी नेमण्यात आलेले 'अमायकस क्युरी' अॅड. विवेक शिराळकर यांची मदत घेण्याचेही निर्देश दिले होते. त्यानुसार, सरकारी अधिकाऱ्यांसोबत तीन बैठका घेतल्यानंतर शिराळकर यांनी शिफारशी सादर केल्या. या शिफारशींप्रमाणे कार्यवाही करणे सुरू करावी आणि त्यात पालघर जिल्हाधिकारी व अन्य संबंधित अधिकाऱ्यांनीही सहकार्य करावे, असे निर्देश खंडपीठाने दिले.
ह्या आहेत शिफारशी