मुंबईतील वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई ट्राफिक पोलिस (Mumbai Traffic Police) यांनी वरळीतील जी.एम.भोसले रोड (G M Bhosale Road) येथे तात्पुरते कडक पार्किंग निर्बंध लागू केले आहेत.
पी. के. कुर्णे चौक ते आचार्य अत्रे चौक (वरळी नाका) जोडणारा हा महत्त्वाचा दुतर्फा मार्ग आहे. येथे मोठ्या प्रमाणावर वाहनांची आणि पादचाऱ्यांची वर्दळ असते. वाढती वाहतूक आणि मुख्य रस्त्यावर होणारी बेशिस्त पार्किंग यामुळे सतत कोंडी निर्माण होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
वाहनचालकांना अनेकदा सूचना देऊनही मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहने उभी केली जात होती. त्यामुळे प्रशासनाने आता अधिक कडक पावले उचलली आहेत. नव्या अधिसूचनेनुसार:
काही ठिकाणी 24 तास नो-पार्किंग झोन लागू करण्यात आले आहेत
तर काही भागांत तारखेनुसार odd-even पार्किंग नियम लागू करण्यात आले आहेत
यामुळे वाहतुकीचा प्रवाह सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
हे नवीन वाहतूक नियम 7 मे 2026 रोजी रात्री 12:01 पासून लागू झाले असून, 4 ऑगस्ट २०२६ च्या मध्यरात्रीपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात लागू राहतील.
वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू शकते, असा इशाराही दिला आहे.
हेही वाचा