कोरोना व्हायरसनं जगभरात धुमाकूळ घातलाय. चीनमधून हा व्हायरस दुसऱ्या देशांमध्ये पोहोचला. पण दिलासादायक बातमी म्हणजे जिथून हा व्हायर पसरला तिकडची परिस्थिती हळूहळू पूर्व पदावर येतेय.
चीनमधली परिस्थिती नियंत्रणात येतेय. गेल्या दोन दिवसांमध्ये चीनमध्ये नवीन रुग्णांची संख्या अक्षरश: कमी झाली आहे. पण इतर देशांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या या व्हायरसवर चीननं कसं नियंत्रण मिळवलं? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
चीनमध्ये या सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करण्यात आलं. त्यानंतर चीनमधील परिस्थिती आटोक्यात आली. चीन जवळपास दोन महिने लॉक डाऊन होता. लॉक डाऊन झाल्यामुळे एकमेकांच्या संपर्कात येण्याचा प्रश्न उद्भवला नाही. त्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू देखील घरपोच केल्या जायच्या. या सर्व कारणांमुळे तिथला व्हायरस आटोक्यात आला आहे.
सध्या भारतात पूर्ण लॉक डाऊन केलं गेलं नाही. पण राज्य सरकारकडून वर्क फ्रॉम होमचा सल्ला देण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा सल्ला दिला गेलाय. पण अजूनही आपण हे मनावर घेतलं नाही. बंद करण्याचे आदेश असताना अजूनही काही कंपन्यांमध्ये काम केलं जातंय. रेल्वे, बसमध्ये काही प्रमाणात लोकं दिसत आहेत. पण जर लोकांनी सरकारचं ऐकलं नाही तर सरकारला कठोर पावलं उचलावी लागतील.
त्यामुळे शक्य असेल तितकं स्वत:ला लोकांपासून लांब ठेवा. घराबाहेर पडणं टाळा. घरात राहूनच या व्हायरसशी लढा देता येणार आहे. सरकारचा सल्ला ऐकाल तरच या व्हायरसला स्वत:पासून दूर ठेवाल. नाहीतर चीनसारखं आपण आठव्या टप्प्यात पोहचू. एकदा परिस्थिती हाताबाहेर गेली तर संभाळणं कठिण आहे.
हेही वाचा