भिशीच्या नावाखाली ग्राहकांकडून पैसे घ्यायचे आणि वर्षभरानंतर तेवढ्याच पैशांचं सोनं देण्याचं आश्वासन दुकान मालकाकडून दिलं गेलं. त्यानुसार, बहुसंख्य लोकांनी दुकान मालकाकडं लाखो रुपये गुंतवले. मिळालेल्या माहितीनुसार, २८ आणि २९ ऑक्टोबर रोजी रसिकालाल संकलचंद ज्वेलर्सचं दुकान बंद होतं. त्यानंतर व्हॉट्सअॅपवरुन हे दुकान बंद करून ज्वेलर्स फरार असल्याची माहिती व्हायरल होऊ लागली. ज्या लोकांनी इथं गुंतवणूक केली होती आणि जे लोक आसपास राहत होते ते त्याच दिवशी आपले पैसे घेण्यास ज्वेलर्सच्या दुकानात पोहचले. त्यानंतर उपस्थित गुंतवणूकदारांना ज्वेलर्सकडून गुंतवणुकीच्या बदल्यात सोनं वाटण्यात आलं.
हेही वाचा -
मध्य रेल्वेच्या कल्याण ते बदलापूर, आसनगावपर्यंत १५ डबा जलद लोकल
एसी लोकलला प्रदूषणाचा फटका, लोकलमध्ये धूळयुक्त हवेची शक्यता