भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाची हत्या, चेंबूरमधील धक्कादायक प्रकार

मित्रांची भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाची चौघांनी धार धार शस्त्राने हत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. अक्षय राजू देसाई असे या मृत तरुणाचे नाव आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी अमर सुशील सिंह (२०), अजय धर्मालिंगम स्वामी (२९), रमण गोविंदराज शेट्टी (२२), विशाल बाळू जाधव (२२) यांना अटक केली आहे. या प्रकऱणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः- ठाणे मनपा कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार किमान वेतन

चेंबूर (Chembur) येथील हॉटेल अॅम्ब्रॉलजवळील नॅशनल हासस्कूल समोर शुक्रवारी घडली आहे. अक्षय हा आपल्या भावासोबत जात असताना चारही आरोपी त्याच्या मित्राला मारहाण करत असल्याचे त्याला दिसले. त्यावेळी भांडण सोडण्वायासाठी  तेथे गेला. त्यावेळी अमर सुशील सिंह (२०), अजय धर्मालिंगम स्वामी (२९), रमण गोविंदराज शेट्टी (२२), विशाल बाळू जाधव (२२) यांनी अक्षयलाच मारहाण करण्यास सुरूवात केली. मारहाण करताना त्यातील एकाने धार धार शस्त्राने अक्षयवर वार करून तेथून पळ काढला. आर्थिक देवाणघेणाणीवरून आरोपी आणि अक्षयच्या मित्राचा वाद सुरु होता. त्यावेळी अक्षय भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचाः-  ९ गडी राखून मुंबईचा दिल्ली विरोधात दमदार विजय

या प्रकरणातील सर्व आरोपी चेंबूर परिसरातीलच आहेत. त्यावेळी चारही आरोपींनी दारुचे सेवन केले होते. तसेच मृत आणि आरोपी एकमेकांना ओळखतात, अशी माहिती पोलीस चौकशीतून उघड झाली आहे. या प्रकरणी चेंबूर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून चौघांना अटक केली.  

पुढील बातमी
इतर बातम्या