लग्नानंतर अनैसर्गिक संबंधांसाठी आग्रह धरणाऱ्या आणि अत्याचार करणाऱ्या पतीविरुद्ध पत्नीने ट्राँम्बे पोलिसांत तक्रार दिली आहे. विशेष म्हणजे, पतीचे आईवडिल आणि ननद यांनी हुंडय़ासाठी मानसिक आणि शाररिक छळ करत असल्याचा आरोप महिलेने केला आहे. तसेच नवऱ्याने कायद्यात नसताना देखील ट्रीपल तलाक दिल्याचा आरोप महिलेने केला आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी तिच्या नवऱ्याला अटक केली आहे.
हेही वाचाः- लाँग विकेंडमुळे पर्यटकांची अलिबाग, शिर्डी, महाबळेश्वरला पसंती
मिरा रोड परिसरात राहणारा २६ वर्षीय पीडित महिलेचा नवरा हा एका नामकिंत बँकेत मॅनेजर आहे. वर्षभरापूर्वी आरोपी आणि पीडित महिलेचे लग्न झाले होते. मात्र हुंड्यासाठी नवऱ्याच्या घरातल्यांकडून मानसिक आणि शाररिक छळ केला जात होता. तर पीडितेचा नवरा तिच्याकडे अनैसर्गिक संबंधांसाठी आग्रह धरीत होता. नकार दिल्यानंतरही तो तिच्यावर बळजबरी करायचा. त्यामुळे पीडित मुलगी ही नवऱ्यापासून स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न करीत होती. दरम्यान, दोघांमधील संबंध ताणले गेले होते. त्यानंतर त्यांनी पीडित मुलीचा छळ करण्यास सुरुवात केली. तिला माहेरून हुंडा घेऊन येण्यास सांगण्यात आले. तिने हुंडा आणण्यास नकार दिला असता तिला शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक त्रास दिला. नवऱ्याने तिला एका क्षणात स्वतःपासून वेगळ करण्यासाठी ट्रीपल तलाक ही दिला.
हेही वाचाः- मनसे- अॅमेझॉन वादात फ्लिपकार्टची बाजी, ग्राहकांना दिला मराठीचा पर्याय
रोजच्या या त्रासाला कंटाळून अखेर पीडित मुलीने ट्राँम्बे पोलिस ठाण्यात पती, त्याचे आई-वडिल,दीर आणि ननंद विरोधात तक्रार नोंदवली. मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार कलम ३७७, ४९८ (अ), ३५४(अ), ५०४, ३४, भा.द.वि कलमांसह ३,४, मुस्लिम महिला विवाहाचे हक्क संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी ट्राँम्बे पोलिसांनी नवऱ्याला अटक केली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.