अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना हे बॉलिवूडच्या 'पॉवर कपल्स'पैकी एक आहेत. त्यांच्या लग्नाला जवळपास १५ वर्षे उलटली आहेत. १५ वर्षांच्या संसारात त्यांच्या नात्यातील प्रेम अधिक बहरलं आहे. पती-पत्नीमध्ये काही कारणास्तव वादविवाद होतात पण त्यातूनही मार्ग काढून समस्यांवर कशी मात करावी? याचं उदाहरण अक्षय आणि ट्विंकलनं दिलं आहे. समजा, पती किंवा पत्नीपैकी एक जण लग्नाचा वाढदिवस विसरला तर? मग काय विचारू नका बुवा... घरात जे वॉर सुरू होतं, त्याचा विचारही कुणाला करवत नसेल. पण अक्षय आणि ट्विंकलचा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हे नक्कीच कळेल!
खिलाडी कुमारनं हा व्हिडिओ त्याच्या ट्वीटर आणि इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत त्यानं लिहलंय की, 'प्रेमाची काही किंमत नसते, पण काही गोष्टींच्या माध्यमातून प्रेम खूप चांगल्या पद्धतीनं व्यक्त करता येतं.'
ट्विंकल लग्नाच्या वाढदिवसाची तारीख विसरते. ती लग्नाची नक्की तारीख काय? असे अक्षयला विचारते. मात्र, आपल्या आयुष्यातील अतिमहत्त्वाच्या दिवसाची तारीख ट्विंकल कशी विसरू शकते? असा विचार अक्षय करतो. पण ट्विंकलवर चिडण्यापेक्षा अक्षय तिला असे एक गिफ्ट देतो, की ती हा दिवस कधीच विसरू शकत नाही.
हेही वाचा