शशांक आणि शर्मिष्ठाची जमली गट्टी

कलर्स मराठीवरील 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' ही मालिका एका नव्या वळणावर पोहोचली आहे. या मालिकेत शशांक आणि मृणाल पहिल्यांदाच एकत्र प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. याहीपेक्षा या मालिकेत शर्मिष्ठा आणि शशांक केतकर यांची जमलेली गट्टीही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.

चांगलं बाँडिंग

शशांक आणि शर्मिष्ठा यांच्यातील बहीण-भावाचं नातं प्रेक्षकांना खूप आवडत आहे. सिड आणि संयु यांच्यामधील छोटी मोठी भांडणं, सिडचे संयुला समजवणं, त्यांच्यातील धम्माल-मस्ती कुठे तरी प्रेक्षकांना आवडू लागली आहे. केवळ पडद्यावरच नव्हे, तर पडद्यामागेही या दोघांचा बराच दंगा सुरू असतो असं मालिकेशी निगडीत असलेल्या सूत्रांकडून समजतं. मालिकेमुळे ते चोवीस तासातला बराचसा वेळ एकत्र असतात. त्यामुळे दोघेही एकमेकांना खूप चांगले ओळखू लागले असून त्यांचं चांगलं बाँडिंग झालं आहे. 

आवडत्या माणसांच्या यादीत

'सुखाच्या सरींनी हे मन बावरे'मधील या नात्याबद्दल शशांक म्हणाला की, शर्मिष्ठा आणि माझी मैत्री या मालिकेमुळे झाली. 'बिग बॉस मराठी'मुळे मला शर्मिष्ठा कळली. ती खूप एनर्जेटिक आहे, बिनधास्त मुलगी आहे. ज्याच्यावर जीव लावते त्याच्यावर पूर्ण जीव लावते. आता मी तिच्या आणि ती माझ्या आवडत्या माणसांच्या यादीमध्ये आलो आहोत. एक गंमतीदार किस्सा झाला, शर्मिष्ठा मला म्हणाली तिने ललितला चार वेळा सिद्धार्थ अशी हाक मारली. त्यावरूनच कळतं कि आमचं बाँडींग किती छान झालं आहे. 

दुसरी बाजू कौतुकास्पद 

भाऊ बहिणीच्या या नात्याबाबत शर्मिष्ठाही आपल्या भावना व्यक्त करीत म्हणाली की, शशांकबरोबर काम करायला खूप मजा येते आहे. याआधी मी शशांकला केवळ नावाने ओळखत होते, पण या मालिकेमुळे एकमेकांना ओळखायची संधी मिळाली. शशांक एक उत्तम अभिनेता आहे, सीन परफॉर्म करताना त्याची खूप मदत होते. त्याची दुसरी बाजू खूप कौतुकास्पद आहे आणि ती म्हणजे त्याचं स्वत:चं हॉटेल आहे, जे तो उत्तमरीत्या सांभाळतो. सेटवर देखील तो त्याने तयार केलेल्या बऱ्याच गोष्टी आणतो ज्या अप्रतिम असतात.


हेही वाचा -

Exclusive : प्रियाच्या 'त्या' पोस्टने केला अनेकांचा 'पोपट'

वैभवसोबत अमृता-सई निघाल्या 'पॉंडिचेरी'ला...


पुढील बातमी
इतर बातम्या