दगडूशेठ हलवाई गणपती चरणी स्वप्नील-सिद्धू

अभिनेता स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर आता छोट्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. नवीन मालिकेचं औचित्य साधत स्वप्नील आणि सिद्धार्थ यांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन श्रीगणेशाचं दर्शन घेतलं.

जिवलगा २२ एप्रिलपासून

स्वप्नील आणि सिद्धार्थ यांची मुख्य भूमिका असलेली 'जिवलगा' ही ग्लॅमरस लुक असलेली नवी कोरी मालिका २२ एप्रिलपासून सुरू होणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारीत होणाऱ्या या मालिकेत स्वप्नीलसोबत अमृता खानविलकर, तर सिद्धार्थसोबत मधुरा देशपांडे आहे. मराठी टेलिव्हीजन विश्वातील ही खूप वेगळी आणि भव्य-दिव्य अशी मालिका आहे. टेलिव्हीजन विश्वात क्रांती घडवण्यासाठी सज्ज झालेल्या या मालिकेच्या प्रमोशनमध्येच स्वप्नील आणि सिद्धार्थ सध्या बिझी आहेत. 

टेलिव्हिजनवर कमबॅक

'जिवलगा'च्या प्रमोशनच्या निमित्तानं पुण्यात जाण्याचा योग येताच स्वप्नील-सिद्धूनं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची संधी सोडली नाही. श्री गजाननाच्या आशीर्वादानं आपली 'जिवलगा' ही आगामी मालिका यशस्वी होऊन महाराष्ट्रातील घराघरात पोहचावी, असं साकडं स्वप्नील आणि सिद्धार्थ यांनी घातलं. या मालिकेच्या माध्यमातून स्वप्निल आणि सिद्धार्थ बऱ्याच वर्षांनी टेलिव्हिजनवर कमबॅक करत आहेत. त्यामुळं 'जिवलगा' ही मालिका दोघांसाठीही खूपच स्पेशल आहे. 

आगळी-वेगळी प्रेमकथा 

सुपरस्टार कलाकारांचा भरणा असलेल्या 'जिवलगा' या अत्यंत महत्वाकांक्षी अशा मालिकेच्या माध्यमातून स्टार प्रवाह वाहिनी प्रेक्षकांसमोर एक आगळी-वेगळी प्रेमकथा घेऊन येत आहे. 'जो डोळे बंद केल्यावरही दिसतो, तो जिवलगा.. ज्याच्यामुळं आपण आहोत, तो जिवलगा...' अशा आशयाची ही प्रेमकथा आहे. अमृता खानविलकर आणि मधुरा देशपांडे यांच्यामुळं या मालिकेला एक वेगळंच ग्लॅमर लाभलं आहे. ही मालिका डॉ. चंद्रशेखर फणसळकरांच्या गोष्टीवरून प्रेरीत असून, उमेश नामजोशी यांनी दिग्दर्शित केली आहे.

पराग कुलकर्णी यांचं लेखन

मालिकेची संकल्पना स्टार प्रवाहचे कॉन्टेन्ट अँड प्रोग्रामिंग विभागाचे प्रमुख सतीश राजवाडे यांची आहे. विद्याधर पाठारे यांनी या मालिकेची निर्मिती केली असून, पराग कुलकर्णी यांनी लेखन केलं आहे. नातेसंबंधांचे अनेक पैलू उलगडत गेलेले या मालिकेत पाहायला मिळतील. मानवी स्वभाव आणि त्यात दाखविलेली प्रगल्भता व विचार करण्याची पद्धत यांची एक वेगळी शैली या कथेतून समोर येणार आहे. बऱ्याचदा आपली नाती समजून घेण्याची आणि त्यांचे मूल्यमापन करण्याची पद्धत चुकते. आपल्या अवतीभवती असलेल्या माणसांबद्दलचे आपले अंदाज चुकतात. याचा गोष्टींवर या मालिकेची कथा प्रकाश टाकते.


हेही वाचा -

राणी लक्ष्मीबाईंच्या महालात स्पृहा

EXCLUSIVE : मालवणी ‘शेवंता’ बनली भोजपुरी ‘भाभी


पुढील बातमी
इतर बातम्या