पुन्हा एकदा शिजणार 'खिचडी'

टेलिव्हिजन विश्वातील मजेशीर आणि प्रसिद्ध अशी मालिका 'खिचडी' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छोट्या पडद्यावरील ही मालिका बंद होऊन अनेक वर्ष झाली. पण आजही या मालिकेतील पात्र, कथा, संवाद प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत.

एका वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार 'खिचडी' हा कार्यक्रम नव्या अंदाजात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या शूटिंगला सुरुवात झाली असून लवकरच प्रेक्षकांना ही मालिका पाहण्याचा आनंद लुटता येणार आहे. 'खिचडी' या नव्या मालिकेत अनंत देसाई, राजीव मेहता, सुप्रिया पाठक आणि जमनादास मजीठीया दिसणार आहेत. तर जुन्या चेहऱ्यांसोबतच काही नवे चेहरे प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत. जमनादास मजीठिया आणि आतिश कपाडिया हे नव्या पर्वाची निर्मिती करणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ते या मालिकेच्या स्क्रिप्टवर काम करत होते.

'खिचडी' ही मालिका २൦൦२ साली प्रेक्षकांच्या भेटीला आली. प्रेक्षकांनी ही मालिका अक्षरश: डोक्यावर उचलून धरली. २൦൦५ साली 'इंस्टेंट खिचडी' या नावानं मालिकेचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आणला होता. २൦१൦ साली या मालिकेवरच आधारीत चित्रपट देखील काढण्यात आला होता.

अनेक वर्ष या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. पुन्हा एकदा ही मालिका प्रेक्षकांना हसवण्यासाठी येत आहे. त्यामुळे 'खिचडी' या मालिकेच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे.

कव्हर फोटो सौजन्य


हेही वाचा

जॉनी लीवर आणि असरानी यांचा कॉमेडी तडका!

रजनीकांत आणि अक्षयच्या 2.0 चित्रपटाचं ग्रँड म्युझिक लाँच

पुढील बातमी
इतर बातम्या