मुंबईत सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पण मुंबईला पहिल्याच पावसाने चांगलेच धुतले आहे. कारण मुंबईतल्या अनेक भागात पाणी साचले आहे.
दहिसर, बोरिवली. जोगेश्वरी, गोरेगाव, अंधेरी, दादर अशा बऱ्याच ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना देखील करावा लागत आहे.
वांद्रे इथे झाड कोसळल्याने दोन गाड्यांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे वाहतूक कोंडी देखील झाली आहे.
अंधेरी भुयारी मार्गात पाणी साचल्याने अधिकाऱ्यांनी पुढील सूचना मिळेपर्यंत भुयारी मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अंधेरी सबवेच्या पूर्वेकडील वाहतूक अंधेरी स्टेशन रोड आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेकडे वळवण्यात आली आहे.
मुसळधार पावसाचा प्रभाव फक्त अंधेरीपुरता मर्यादित नाही. साकी नाका सिग्नल ते जरीमरी या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असून, ४५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत आहे.
पाणी साचल्याने प्रभावित झालेल्या इतर भागात फ्रीवे आणि असल्फा-साकीनाका जंक्शन यांचा समावेश होतो, जिथे वाहनांची हालचाल बरीच मंदावली आहे. महालक्ष्मी मंदिराजवळील बीडी रोडवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही वाहतूक धीम्या गतीने होत आहे.
शिवाय, किंग सर्कलमध्ये वाहतूक मंदावली आहे, ज्यामुळे दादर ते सायनला जाणाऱ्या प्रवाशांना विलंब होत आहे. भुयारी मार्गाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अधिकाऱ्यांनी अंधेरी सबवेच्या पूर्वेकडून अंधेरी स्टेशन रोड आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेकडे वाहतूक वळवली आहे.
हेही वाचा