26 जुलै बुधवारी मुंबई आणि पालघरसाठी यलो अलर्ट

हवामान खात्याने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. बुधवार, 26 जुलै रोजी मुंबई आणि ठाण्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, रायगड आणि रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने तीन दिवसांसाठी हा अलर्ट जारी केला आहे.


हेही वाचा

भाईंदर स्टेशनवर तांत्रिक बिघाड, पश्चिम रेल्वे 15 मिनिटे उशीराने


महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मान्सूनच्या तीव्र हालचालींमुळे गेले काही दिवस पावसाचा जोर वाढला आहे. या संततधार पावसामुळे, महाराष्ट्राच्या राजधानीत 777.8 मिमी पावसाची नोंद झाली, जी 29% अधिक आहे, तर उपनगरात 1347.7 मिमी पाऊस पडला, जो 95% अधिक आहे.

उर्वरित महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांतही या आठवड्यात जोरदार पाऊस पडेल. त्यानुसार या जिल्ह्यांमध्ये मंगळवार ते शुक्रवार दरम्यान ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.


हेही वाचा

मुंबईत 8 दिवसांत तिसऱ्यांदा 100 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद

गोरेगाव NNP तील IT Park जवळील रस्त्याची एक लेन बंद

पुढील बातमी
इतर बातम्या