अतिवृष्टीमुळं आलेल्या पुरानं जसे वास्तवात अनेक कुटुंबांचा संसार उद्ध्वस्त केले, तसेच कल्पनाविश्वातील काही संसारही उधळले. या विळख्यात छोट्या पडद्यावरील सिद्धी आणि शिवाचंही आयुष्य अडकलं आहे.
मागच्या आठवड्यात पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांना महापुरानं वेठीस धरलं होतं. महापुरामुळं तेथे हाहाकार उडाला होता. जनजीवनही विस्कळीत झालं होतं. आता मात्र हे जिल्हे पूर्ववत होण्याच्या मार्गावर आहेत आणि त्यासाठी तसा प्रयत्न देखील सुरू आहे. सांगलीमध्ये कलर्स मराठीवरील ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेचं चित्रीकरण सुरू आहे, येथील पूर परिस्थितिमुळं शूटिंग थांबावावं लागलं होतं; परंतु मालिकेचे कलाकार आणि संपूर्ण युनिट सुरक्षित जागी होतं.
हेही वाचा -
Movie Review: 'मंगळ' ग्रहाच्या प्रवासाची 'सुमंगल' कहाणी
मराठी कलाकारांचा राष्ट्राभिमान! राष्ट्रगीतासाठी एकवटले ७५ तारे