बोल मुंबई: अभिनेत्यांनी निवडणूक लढवली पाहिजे? मुंबईकरांचं मत काय? बघा व्हिडिओ

यंदा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अनेक अभिनेत्यांनी राजकीय पक्षांमध्ये उडी मारली आहे. उर्मिला मातोंडकर, सनी देओल यांसारख्या अभिनेत्यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु, अभिनेत्यांनी निवडणूक लढवली पाहिजे का ? या मुद्द्यावर मुंबईकरांची मत काय आहेत हे मुंबई लाइव्हनं जाणून घेतली आहे. यावेळी 

मुंबईकरांच म्हणणं आहे की, अभिनेते निवडून आले तरी चालतील किंवा नाही आले तरी चालतील. परंतु, त्यांनी अभिनेते आहे याचं भान ठेऊन तसंच आपण एक सामान्य नागरिक आहे याच भान ठेऊन लोकांसाठी काम करणं महत्वाचं आहे, असं म्हटलं आहे.

त्याशिवाय, काही मतदारांनी अभिनेत्यांना राजकारणाची योग्य माहिती नसल्यामुळं त्यांनी राजकारणात येणं योग्य नसल्याचं म्हटलं आहे.


हेही पाहा -

बोल मुंबई: मनसेचा भाजपाविरोधी प्रचार आघाडीच्या पथ्यावर पडणार का? काय आहे तरूणाईचं मत? पाहा व्हिडिओ

बोल मुंबई: देशात कुणाचं सरकार येणार? मुंबईकरांचं मत काय? बघा व्हिडीओ


पुढील बातमी
इतर बातम्या