Advertisement

बोल मुंबई: देशात कुणाचं सरकार येणार? मुंबईकरांचं मत काय? बघा व्हिडीओ


बोल मुंबई: देशात कुणाचं सरकार येणार? मुंबईकरांचं मत काय? बघा व्हिडीओ
SHARES

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय उमेदवार एकमेकांवर टीका करत आपला पक्ष सर्वश्रेष्ठ असल्या दावा करत आहेत. तसंच आपलं सरकार पुन्हा यावं यासाठी अनेक उमेदवार आपला जोरदार प्रचार करत आहेत. मात्र, या मुद्दयावर मुंबईकरांची मत काय आहे? हे मुंबई लाइव्हनं जाणून घेतलं आहे. यावेळी भाजपा सरकारनं सुधारणा केली असून देशात पुन्हा भाजपा सरकार येणार असल्याचं मुंबईकरांनी म्हटलं आहे.


मुंबईकरांच म्हणणं आहे की, भाजपा सरकारनं भ्रष्टाचारांविरोधात कारवाई करत त्यांना पकडलं आहे. तसंच जगात भारत देशाचं नाव केलं आहे. देशासाठी विविध योजना मोदींनी राबविल्या आहेत. त्यामुळं यंदा मोदी सरकारचं येणार असल्याची सांगितलं. तर दुसऱ्या मतदारानं मोदी सरकारमुळं महागाई वाढत चालली आहे. आधीचं काँग्रेस सरकार यांच्यापेक्षा खूप चांगलं होतं, असं म्हणत काँग्रेस सरकारच्या बाजूनं मत व्यक्त केलं.

दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यामुळं मोदी सरकारविरोधात अनेक मुंबईकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.



हेही पाहा -

बोल मुंबई: नोटबंदीमुळं सरकारला नुकसान होणार ? युवकांचं मत काय? बघा व्हिडिओ

बोल मुंबई: राफेल सौदा भाजपाच्या अडचणीचा? युवकांचं मत काय? बघा व्हिडिओ



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा