विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या महाआघाडीने सोमवारी आपला जाहीरनामा अर्थात 'शपथनामा' सादर केला. या 'शपथनाम्यात' शेती-उद्योग, शिक्षण, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि नियोजनबद्ध शहरीकरणाच्या मुद्द्यांवर आश्वासने देण्यात आली आहेत. तसंच तरूण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना केंद्रस्थानी ठेवण्यात आलं आहे.
या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष एकनाथ गायकवाड, राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक, असे नेते उपस्थित होते.
थोरात आणि पाटील यांनी एकत्रितरित्या जाहीरनामा सादर केला. समाजातील प्रत्येक घटकाचा विकास तसंच १७ शाश्वत विकास उद्दिष्टांच्या’ अंमलबजावणीसाठी काँग्रेस आघाडी वचनबद्ध असल्याचं त्यांनी यावेळी त्यांनी सांगितलं.
हा जाहीरनामा तयार करण्यासाठी आघाडीच्यावतीने एक समिती तयार करण्यात आली होती. यामध्ये राष्ट्रवादीच्या खा. वंदना चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भालचंद्र मुनगेकर यांचा समावेश होता.
हेही वाचा-
भाजपची ‘अडचण’ समजून युती केली- उद्धव ठाकरे
Shiv Smarak Scam: भाजपच्या भ्रष्टाचाराचा ‘असा’ केला भांडाफोड- सचिन सावंत