राष्ट्रवादीतून एक गट फोडून अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र या शपथविधीला अजित पवार यांच्यासोबत गेलेले राष्ट्रवादीचे अनेक आमदार पुन्हा पक्षाकडे परतले आहेत. या आमदारांनी बंडखोरी करण्यास नकार दिला आहे.
राष्ट्रवादीचे सिंदखेडराजाचे आमदार राजेंद्र शिंगणे, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, पंकज जाधव, निफाडचे आमदार दिलीपराव बनकर, माणिकराव कोकाटे गे आमदार पुन्हा परतले आहेत. शिंगणे, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर या आमदारांनी उद्धव-पवार यांच्या पत्रकार परिषदेत घडलेला घटनाक्रम सांगितला. .
'आम्हाला काल रात्री अजित पवार यांचा फोन आला. त्यांनी आम्हाला मुंबईत येण्यास सांगितलं आणि सकाळी राजभवानाकडे घेऊन गेले. मात्र आम्हाला शपथविधीची कोणतीही कल्पना दिली नव्हती. आम्हाला ते मान्य नाही. आम्ही परत पवारसाहेंबाकडे आलो आहोत,
राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे देखील परतले आहेत. त्यांनी ट्वीटरवरून यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं.
हेही वाचा