भाजपचा अहंकार संपवला- नवाब मलिक

देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचा विजय आहे. महाराष्ट्राने त्यांचा अहंकार संपवला, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवर टीका केली.

माध्यमांशी बोलताना मलिक म्हणाले, ‘हंगामी अध्यक्षांच्या माध्यमातून इन कॅमेरा बहुमत सिद्ध करता येणार नाही हे भाजपच्या लक्षात आलं. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला. हे गोवा, मणिपूर आणि कर्नाटक नाही हे पवार साहेबांनी कालच सांगितलं होतं. त्यांचा राजीनामा हा महाराष्ट्राच्या जनतेचा विजय आहे. आता आमदारांच्या बैठकीत नेता निवडीचा कार्यक्रम होईल. त्यात महाविकास आघाडीच्या नेत्याची निवड करण्यात येईल.

मुख्यमंत्री कोण होणार? याविषयी बोलताना मलिक यांनी सांगितलं की, महाविकास आघाडीच्या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आधीच स्पष्ट केलं आहे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असतील. त्यांनीदेखील समोरासमोर होकार दिल्याचं मलिक म्हणाले.


हेही वाचा-

चौथ्या दिवशीच फडणवीस सरकार कोसळलं, विश्वासदर्शक ठरवाआधीच दिला राजीनामा

राजीनामा देऊन देवेंद्र फडणवीस यांनी केला 'हा' विक्रम


पुढील बातमी
इतर बातम्या