''अयोध्या वारीसाठी शुभेच्छा, पण राज्यातील गंभीर प्रश्नांचं काय?'' अशा प्रकारचा प्रश्न विचारत मनसेकडून पुन्हा एकदा शिवसेनेविरोधात पोस्टरबाजी करण्यात आली आहे. दादरमधील शिवसेना भवन परिसरात मनसेने ही पोस्टरबाजी केलेली पाहायला मिळत आहे. या पोस्टरमधून मनसेने सत्तेत बसलेल्या शिवसेनेला थेट सवाल केला आहे.
महाराष्ट्रातील रस्ते खड्डेमुक्त होणार का?, महागाई कमी होणार का? महाराष्ट्रात महिला सुरक्षित राहणार का? बेरोजगारांना रोजगार मिळणार का? शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित करत मनसेने दसरा मेळाव्यातील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणावरून पोस्टरबाजी केली आहे.
शिवाजी पार्कमध्ये झालेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी येत्या २५ नोव्हेंबरला अयोध्येत जाऊन राम मंदिराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारणार आहे, अशी घोषणा केली होती. त्यावर मनसेने काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
हेही वाचा-
तुम्ही राममंदिर बांधता की आम्ही बांधू?, उद्धव ठाकरे २५ नोव्हेंबरला आयोध्येत
#MeToo: नाना 'तसे' नाहीत, राज यांनी केली पाठराखण!