कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू नये म्हणून देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लोकांना घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे.त्यामुळे लोकांना घरात वेळ घालवण्यासाठी इंटरनेटचा मोठा आधार आहे. एकाच वेळी लाखो लोक इंटरनेट वापरत असल्यामुळे इंटरनेट सेवेवर मोठा ताण आहे. भारतासह जगभरातील इंटरनेट सेवा ढेपाळली आहे.
इंटरनेट ही आजच्या तरुण वर्गाची अत्यंत गरजेची गोष्ट आहे. घरबसल्या पब्जीसारखे अनेक ऑनलाईन गेम खेळून तरुण मंडळींचा टाईमपास होईल अशी अपेक्षा होती. मात्र इंटरनेट अभावी ती आशाही मावळली. त्यामुळे तरुणाई सध्या कॅरम, पत्ते या जुन्या खेळांकडे वळली आहे. मात्र ते तरी किती वेळ खेळणार? विरंगुळा म्हणून टिकटॉक ओपन करावं तरी व्हिडीओ ओपन होत नाही, त्यामुळं आता काय करावं? असा प्रश्न तरुणाईला पडला आहे.
इंटरनेटची ही समस्या फक्त मुंबई, महाराष्ट्र किंवा भारतापुरती मर्यादित नाही. तर जगभरात ही समस्या भेडसावत असल्याचं इंटरनेट क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं मत आहे. एरवी दिवसाला येणाऱ्या तक्रारी सध्या तिप्पट वाढल्या आहेत. स्पीडही अतिशय कमी आहे. मात्र सध्या तरी यावर काहीच उपाय नाही. कोरोनाशी लढण्यासाठी घरात बसण्याच्या सरकारच्या आवाहनाला सगळेच प्रतिसाद देत आहे. मात्र कधीच इतके दिवस घरी बसायची आणि इंटरनेट शिवाय जगायची सवय नसलेल्या नागरिकांना आता इंटरनेटच मिळालं नाही, तर वेडंपिसं व्हायची वेळ येईल, हे मात्र नक्की.
हेही वाचा -
कोरोनावर मात करण्यासाठी सरकारला शिवसेनेची साथ
Coronavirus Updates: आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणं १४ एप्रिलपर्यंत बंद