देशभरात कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन सुरू आहे. संचारबंदी असल्यामुळे लोकांना घरात बसूनच राहावंं लागत आहे. त्यामुळे वेळ घालवण्यासाठी मोबाइलचा सर्वाधिक वापर होत आहे. लाॅकडाऊनच्या काळात देशात दिल्ली आणि मुंबईमध्ये सर्वाधिक इंटरनेटचा वापर होत आहे. इंटरनेट आणि मोबाइल असोसिएशन ऑफ इंडियाने (आयएएमएआय) ताज्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.
मार्च 2019 ते नोव्हेंबर 2019 या कालावधीतील 3 कोटी नवे इंटरनेट वापरणारे हे निम्न श्रेणीतील आहेत. त्यापैकी २ कोटी वापरकर्ते ग्रामीण भारतातील आहेत. भारतातील 2/3 इंटरनेट वापरकर्ते 12 ते 29 वर्षांच्या वयोगटात येतात. आणि हे वयोगट ग्रामीण भागातील इंटरनेट वापरकर्त्यांपैकी 70 टक्क्यांपेक्षा अधिक आहेत. मुंबई आणि चेन्नईमध्ये 12 ते 29 वर्ष आणि 30 वर्षांपुढील वय असलेल्यांचे इंटरनेट वापरणाऱ्यांचं प्रमाण 50:50 टक्के आहे.
हेही वाचा -