निसर्ग चक्रीवादळाचा वेग वाढला असून दुपारी अलिबाग किनाऱ्यावर हे वादळ धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळं संपूर्ण कोकण पट्टा आणि दमण, गुजरात वेगानं वारे वाहत आहेत. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर १ जूनपासून सुरू करण्यात आलेल्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मुंबईहून सुटणाऱ्या आणि मुंबईत येणाऱ्या काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे.
मुंबईहून सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वेळत बदल
'या' रेल्वे उशिरानं मुंबईत पोहोचणार
मुंबई पोलीस देखील सज्ज झालेले आहेत. नागरिकांना समुद्र किनारी न जाण्याचं आवाहन पोलीसांकडून करण्यात आलं आहे. मुंबई पोलिस कर्मचारी आणि त्यांच्यासोबत अतिरिक्त पोलिस दल, एनडीआरएफ, एसआरपीएफ, होमगार्डचे तैनात करण्यात आलेले आहेत. ज्या ठिकाणी पाणी साचतं अशा ठिकाणी लोकांनी जाऊ नये, असेही आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच ट्रॅफिक विभागाकडून ट्रॅफिकमध्ये बदल करण्यात आलेले आहेत.
हेही वाचा -
निसर्ग चक्रीवादळ मुंबईपासून १५० कि.मी. अंतरावर
गाडीनं प्रवास करत असाल तर हातोडा जवळ ठेवा- महापालिका