'या' तारेखपर्यंत मुंबई - गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी

गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणपती उत्सवासाठी कोकणात (konkan) जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी असते. यावेळी वाहतूक कोंडीची कोणतीही समस्या येऊ नये यासाठी मुंबई-गोवा हायवेवरील (Mumbai-Goa Highway) अवजड वाहतूक ही बंद ठेवण्यात येणार आहे.

गणेशोत्सवापूर्वी सुमारे आठवडाभरापासूनच मुंबई-गोवा हायवेवर वाहनांची वर्दळ सुरु असते. तर, वाहनांच्या वाढत्या संख्या आणि अवजड वाहनांमुळे अनेक वेळा तासनतास वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते.

यामुळे, गणेशोत्सवापूर्वी 27 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

त्यातच, राज्य परिवहन महामंडळाद्वारे गणेश चतुर्थी निमित्ताने कोकणवासियांच्या सोयीसाठी ज्यादा बसेस सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या वाहनांचा प्रवास विनाअडथळा आणि वेळेत होण्यासाठी मोटार वाहन अधिनियम, 1988 च्या कलम 1915 मधील तरतुदींचा वापर करुन महाराष्ट्र शासन या आदेशाद्वारे सार्वजनिक हितास्त पनवेल ते इन्सुली सावंतवाडी या राष्ट्रीय महामार्गासाठी पनवेल ते सिंधुदुर्गवरुन होणारी रेतीचे ट्रक, ट्रेलरची तसेच वाहनांच्या वाहतुकीबाबत आदेश जारी केले आहेत.

ज्या वाहनांची वजनक्षमता 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त आहे अशी जड अवजड वाहनं, ज्यामध्ये ट्रक, मल्टी एक्सल, ट्रेलर इत्यादी वाहनांवर ही बंदी लागू असेल.

अवजड वाहनांच्या वाहतुकीच्या निर्बंधांमधून दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर, लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन, अन्न धान्य, भाजीपाला आणि नाशवंत माल इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना वगळण्यात आलं आहे.


हेही वाचा

...तर मुंबईच्या प्रत्येक स्टेशनवर आग लागेल : जितेंद्र आव्हाड

...नाहीतर 15 सप्टेंबरपासून बेमुदत बंद करू, मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचा इशारा

पुढील बातमी
इतर बातम्या