रावसाहेब दानवे संबोधित करताना म्हणाले की, महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य व देशातून अनेक अनुयायी मुंबईत येतात. त्यांची गैरसोय होणार नाही, यासाठी रेल्वे स्थानकावर त्यांना शक्य त्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी आणि पश्चिम रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक प्रकाश भुतानी यांनी महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीबाबत राज्यमंत्र्यांना सादरीकरण केले. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी पूर्वनियोजित ब्लॉकमुळे मुंबईत महापरिनिर्वाण दिनासाठी येणाऱ्या भाविकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल आणि नियमित सेवा सुरू राहील, असे आश्वासन दिले.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे 14 अतिरिक्त विशेष गाड्या चालवणार आहे. तसेच आदिलाबाद-मुंबई एक्स्प्रेसमध्ये एक अतिरिक्त डबा जोडण्यात येणार आहे. श्री मुकुल जैन, प्रधान मुख्य संचालन व्यवस्थापक, यांनी अतिरिक्त विशेष गाड्यांबद्दल सविस्तर माहिती दिली. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री रजनीश गोयल यांनी सांगितले की, मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गावर १२ उपनगरीय विशेष गाड्या चालवण्याची योजना आखली जात आहे.
मध्य रेल्वेचे प्रिन्सिपल चीफ कमर्शियल मॅनेजर मणजीत सिंग यांनी सांगितले की, दादर आणि इतर स्थानकांवर प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी तिकीट तपासणी कर्मचार्यांना विशेष कर्तव्य दिले जाईल. अमरेश कुमार, मुख्य सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त अतिरिक्त गर्दीचे निरीक्षण आणि नियंत्रण करण्यासाठी आरपीएफने केलेल्या तयारीची माहिती दिली.
चित्तरंजन स्वैन, पश्चिम रेल्वेचे प्रधान मुख्य संचालन व्यवस्थापक प्रवीणचंद्र परमार; प्रधान मुख्य व्यावसायिक व्यवस्थापक, पी. सी. सिन्हा, प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त; पश्चिम रेल्वेच्या मुंबई मध्य विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज वर्मा यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त करण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली.
हेही वाचा