राज्यात गुरुवारी मान्सूनचं (Mumbai Monsoon) आगमन झालं. असं असलं तरी अद्याप मुसळधार पाऊस (Mumbai Rains) पडला नाही. पण शनिवार, रविवारी या दोन्ही दिवशी पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी अति वृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. वेधशाळेनं पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातल्या ८ जिल्ह्यांसाठी नारिंगी इशारा (Orange Alert)जारी केला आहे.
१३ जूनला कोकणातले सगळे जिल्हे आणि कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शनिवारच्या दिवशी मुंबई(Rain in Mumbai), ठाणे, पुणे, नगर या भागांतही काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. रविवारचा दिवसही पावसाचा असेल आणि या दिवशी ८ जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. या भागात अतिवृष्टी होऊ शकते.
शुक्रवारी विदर्भातही काही भागात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. नागपूरला संध्याकाळी जोरदार वाऱ्यासह, ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडला. सोमवारीसुद्धा पुणे, नगर, नाशिकसह उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडू शकतो, असं भारतीय हवामान विभागाच्या मुंबई उपविभागानं जारी केलेल्या हवामानाच्या अंदाजात म्हटलं आहे.
हेही वाचा