मुंबईत कोरोनाचे १२५७ नवे रुग्ण, ५५ जणांचा दिवसभरात मृत्यू

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात काल पहिल्यादांच एका दिवसात कोरोना रुग्णांनी १० हजाराचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात आज कोरोनाने २९८ जणांचा बळी घेतला. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत गुरूवारी दिवसभरात १२५७ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत गुरूवारी दिवसभरात ५५ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः-महाराष्ट्राला जगातील सर्वोत्तम आरोग्य सुविधा असणारं राज्य बनवणार- मुख्यमंत्री

मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत गुरूवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५५ रुग्ण दगावले आहेत. तर २२ जुलै रोजी ५८ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी २१ जुलै रोजी एकूण ६२ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, गुरूवारी मुंबईत कोरोनाचे १२५७ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख ५८२९ इतकी झाली आहे. तर गुरूवारी दिवसभरात १९८४ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ७७ हजार १०२ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः- जिम, माॅल सुरू करणार पण.., राजेश टोपेंनी केला खुलासा

राज्यात आज ६४८४ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.९ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ९४ हजार २५३ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ९८९५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ४० हजार ०९२ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १७ लाख ३७ हजार ७१६ नमुन्यांपैकी ३ लाख ४७ हजार ५०२ नमुने पॉझिटिव्ह (२० टक्के) आले आहेत. राज्यात ८ लाख ७४ हजार २६७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४४ हजार २२२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २९८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.७ टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले  २९८ मृत्यू हे मुंबई मनपा-५५, ठाणे-७, ठाणे मनपा-१, नवी मुंबई मनपा-७,कल्याण-डोंबिवली मनपा-१८, उल्हासनगर मनपा-८, भिवंडी निजामपूर मनपा-४, मीरा-भाईंदर-२, वसई-विरार मनपा-२३, पालघर-२,रायगड-३, नाशिक-५, नाशिक मनपा-८, मालेगाव मनपा-२, अहमदनगर-१, धुळे मनपा-२, जळगाव-८, जळगाव मनपा-५, पुणे-१९, पुणे मनपा-३७, पिंपरी-चिंचवड मनपा-२२,सोलापूर-१, सोलापूर मनपा-२, सातारा-१, कोल्हापूर-३, कोल्हापूर मनपा-१, सांगली-२, सांगली मिरज कुपवाड मनपा-३, रत्नागिरी-२, औरंगाबाद मनपा-१०, जालना-३, हिंगोली-४, परभणी मनपा-१, लातूर-५, लातूर मनपा-१, उस्मानाबाद-१, बीड-३, नांदेड मनपा-४, अकोला-१, अमरावती मनपा-२,यवतमाळ-२,  नागपूर मनपा-१, या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील तर इतर राज्य ६ अशी नोंद आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या