केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी सकाळी प्रभादेवीतील सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप रविवारी सोलापूर इथं अमित शहा यांच्या उपस्थितीत झाला. त्यानंतर शहा मुंबईत दाखल झाले.
सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर शहा राजभवनकडे रवाना झाले. दुपारच्या सुमारास ते मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत.
दरम्यान रविवारच्या कार्यक्रमात शहा यांनी शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. भाजपाने अजून आपले दरवाजे पूर्णपणे उघडलेले नाहीत. हे दरवाजे पूर्ण उघडल्यास विरोधी पक्षांत शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याशिवाय कुणीही उरणार नाही, असं ते म्हणाले.
हेही वाचा-
भाजपाने दरवाजे उघडल्यास विरोधकांमध्ये पवारांशिवाय कुणीही उरणार नाही- शहा
अन् शरद पवार भडकले, पत्रकार परिषद सोडून चालू लागले