Advertisement

मुंबईत २४ तासात तब्बल 'इतक्या' कावळ्यांचा मृत्यू

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून बर्ड फ्ल्यूचा संसर्ग वाढत आहे. या बर्ड फ्लूमुळं अनेक पक्षांचा मृत्यु होत आहे.

मुंबईत २४ तासात तब्बल 'इतक्या' कावळ्यांचा मृत्यू
SHARES

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून बर्ड फ्ल्यूचा संसर्ग वाढत आहे. या बर्ड फ्लूमुळं अनेक पक्षांचा मृत्यु होत आहे. अशातच आता मागील २४ तासात मुंबईत तब्बल ११४ कावळ्यांचा मृत्यू झाल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. महापालिकेनं तयार केलेल्या हेल्पलाईनवर गेल्या १५ दिवसांपासून कावळे, कबुतरे, चिमण्या मृत पावल्याबाबत तब्बल २ हजार ४०४ तक्रारीची नोंदी झाल्या आहेत.

५ जानेवारीपासून मुंबईत कावळे, कबुतरे, चिमण्यांनाच्या मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे मुंबईत बर्ड फ्ल्यूच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे महापालिकेने अंडी, मांस, चिकन चांगले शिजवून खाण्याचं आवाहन केलं आहे.

या पार्श्वभूमीवर अनेक मुंबईकरांनी बर्ड फ्लूच्या भीतीनं, अंडी खाणं बंद केलं आहे. त्यामुळं मुंबईकरांमध्ये बर्ड फ्ल्यूची भीती वाढताना दिसत आहे. मुंबईत गेल्या ५ जानेवारीपासून कावळे, कबुतरे मृत पावल्याच्या घटनासत्राला सुरुवात झाली. त्यानंतर गिरगाव, चेंबूरसारख्या मुंबईच्या अनके ठिकाणाहून कावळे, कबुतरे, मृत पावल्याच्या घटना वारंवार घडत आहेत.

मुंबईतील मालाड, दादर, सायन, माटुंगा, बोरिवली, कांदिवली, अंधेरी, प्रभादेवी, वडाळा, माटुंगा, सायन, मानखुर्द, गोवंडी, चंदनवाडी आदी परिसरातही कावळे कबुतरे मृत पावल्याच्या तक्रारी पालिकेच्या हेल्पलाईनवर येत आहेत.

मुंबईत बर्ड फ्लूचा धोका वाढत असल्यानं महापालिकेनं नागरिकांना भयभित न होता पालिका आपत्कालीन व्यवस्थापन विभागातील १९१६ या हेल्पलाईनवर मृत पक्षांबाबत तक्रारी करण्याचे आवाहन केले होते. यानुसार पालिकेकडे आता मृत कावळे व कबुतरे यांच्याबाबत तक्रारींचा ओघ वाढू लागला आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा