Advertisement

मुंबईत कोरोनानं घेतला आणखी २५ जणांचा बळी

कोरोनानं मुंबईत आणखी २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील कोरोना मृत्यूंची संख्या २४४ वर पोहचली आहे.

मुंबईत कोरोनानं घेतला आणखी २५ जणांचा बळी
SHARES

मुंबईत कोरोनाचा धोका आता अधिक वाढला आहे. कोरोनानं मुंबईत आणखी २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील कोरोना मृत्यूंची संख्या २४४ वर पोहचली आहे. तसंच, करोनाबाधित नवीन रुग्णांचाही संख्या दिवसागणिक वाढत असून, ३९३ नवीन रुग्णांची भर पडून एकूण रुग्णसंख्या ५ हजार ९८२वर पोहचली. कोरोनाच्या संसर्गानं मुंबईत ५ हजाराचा आकडा पार केल्यानं मुंबईकरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

मागील दिवसांमध्ये मुंबईत कोरोना मृत्यूदर खाली आला होता. मात्र, पुन्हा मृत्यूंचं प्रमाण वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत २५ रुग्णांची भर पडली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे २० रुग्ण दगावले आहेत तर २३ ते २५ एप्रिल दरम्यानच्या ५ मृतांची नोंद आकडेवारीत करण्यात आली आहे. त्याशिवाय, मुंबईत कोरोनाचे २९१ नवीन रुग्ण आढळले आहेत.

२५ आणि २६ एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या चाचण्यांचे काही अहवाल आले असून, त्यात १०२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. अशा एकूण ३९३ नवीन रुग्णांची भर पडली आहे. दुसरीकडे कोरोना सदृष्य लक्षणं असलेले ४३१ रुग्ण विविध रुग्णालयांत भरती झाले असून अशा रुग्णांची एकूण संख्या आता ९ हजार १५५ इतकी झाली आहे.

मुंबईत एकाच दिवसात करोनाचे २१९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत करोनाची लागण झालेल्या एकूण १ हजार २३४ रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा