
हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार एल निनो आणि इतर हवामान घटकांमुळे यंदाचा मान्सून लांबू शकतो. त्यामुळे 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पाणी व्यवस्थापनाचे नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था, MIDC आणि इतर यंत्रणांना दररोज 20 टक्के पाणी कपात लागू करण्यास सांगण्यात आले आहे.
या निर्णयानुसार KDMC च्या नेतिवली, बारावे आणि मोहिली जलशुद्धीकरण केंद्रांमधून ठराविक दिवशी 24 तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
पाणी कपातीचे वेळापत्रक :
12 आणि 15 जून – डोंबिवली पूर्व (F वॉर्ड) – नेतिवली जलशुद्धीकरण केंद्र परिसर
13 आणि 18 जून – कल्याण पूर्व (A वॉर्ड), कल्याण पश्चिममधील गोदरेज हिल, पार नाका, सुभाष मैदान परिसर – बारावे केंद्र
14 आणि 19 जून – डोंबिवली पश्चिम (H वॉर्ड)
15 जून – कल्याण पश्चिम (B आणि C वॉर्ड)
16 आणि 20 जून – मांडा-टिटवाळा, बदलापूर, अंबिवली, शाहाड, अटाळी, कल्याण ग्रामीण, योगीधाम, मिलिंद नगर, कॉलेज परिसर, चिकणघर, मुरबाड रोड आणि बाल्याणी परिसर – मोहिली केंद्र
महापालिकेने स्पष्ट केले आहे की संबंधित भागांमध्ये ठरलेल्या दिवशी मध्यरात्रीपासून पुढील मध्यरात्रीपर्यंत पूर्ण 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
नागरिकांनी आवश्यक तेवढेच पाणी साठवून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा
