Advertisement

पुण्याच्या केमिकल कंपनीच्या मालकाला अटक

उरवडे गावाजवळील केमिकल कंपनीला लागलेल्या भीषण आगीत १८ जणांचा मृत्यू झाला होता

पुण्याच्या केमिकल कंपनीच्या मालकाला अटक
SHARES

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात (Pune Mulshi Tehsil) असलेल्या उरवडे गावाजवळील केमिकल कंपनीला (Chemical Company Fire near Urawade) लागलेल्या भीषण आगीत १८ जणांचा मृत्यू (18 people died) झाला.

या आग दुर्घटना प्रकरणाचा चौकशी अहवाल जिल्हाधिकारी आणि राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. तसंच या प्रकरणी कंपनीचा मालक निकुंज शहा (Nikunj Shah arrest) याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पोलिसांनी अटक (Company Owner) केली आहे.

उरवडे आग दुर्घटना प्रकरणाचा चौकशी रिपोर्ट जिल्हाधिकारी आणि राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. बेकायदा अतिरिक्त ज्वलनशील पदार्थांचा साठा करणे, कर्मचाऱ्यांच्या ईएसआयएस अंतर्गत नोंदी नसणे, फायर सेफ्टी नियम अर्थात अग्निसुरक्षा शर्थींच उल्लंघन करण्यात आल्याचं अहवालात म्हटलं आहे. यासोबतच २०१६ ते २०२० प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगी शिवाय रासायनिक प्रक्रिया उद्योग चालवणे, पीएमआरडीएच्या परवानगी शिवाय कंपनीच्या मूळ बांधकामात बदल केल्याचंही म्हटलं आहे.

अहवालात म्हटलं आहे की, कर्मचाऱ्यांना स्वयंचलित दरवाजा स्फोटाच्या प्रेशरने बंद झाल्यानंतर बाहेर पडणं अशक्य झालं. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला.

उरवडे इथल्या केमिकल कंपनीला लागलेल्या आगीत एकूण १८ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. समोवारी लागलेली ही आग अवघ्या काही क्षणातच झपाट्यानं पसरली. या आगीत होरपळून मृत्यू झाल्यानं त्यांची ओळख पटवणं कठीण झालं. त्यामुळे डीएनए टेस्ट करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले जाणार आहेत.

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. सोबतच मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयाची आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा