Advertisement

उकाडा वाढल्यानं मुंबईकर घामाघूम

मुंबईचे कमाल तापमान ३५ अंशावर स्थिर असले तरी ऊकाड्यात काही प्रमाणात वाढ झाल्यानं मुंबईकर घामाघूम होत आहेत.

उकाडा वाढल्यानं मुंबईकर घामाघूम
SHARES

मुंबईचे कमाल तापमान ३५ अंशावर स्थिर असले तरी ऊकाड्यात काही प्रमाणात वाढ झाल्यानं मुंबईकर घामाघूम होत आहेत. कोरोनामुळं नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई आहे. परंतु, उकाड्यामुळं घरी राहणं अनेकांना कठीण जात आहे. दरम्यान कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गरम पदार्थांचं सेवन करण्याचे राज्य सरकारनं आदेश दिले असून, एसीचा वापर कमी करण्यास सांगितलं असताना ऐन उन्हाळ्यात उकाडा सहन होत नाही आहे.

मुंबईसह राज्यभरातील तापमानातही वाढ झाली आहे. मात्र असं असलं तरी, अवेळी कोसळणारा पाऊस नागरिकांना अधिकच तापदायक ठरणार आहे. येत्या काळात कमाल तापमानात आणखी वाढ होणार आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच कमाल तापमानाचा पारा वाढू लागला आहे. एप्रिल, मे आणि जून महिन्यात उन्हाळा आणखी तापदायक असणार आहे.

बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाची नोंद ४० अंश होईल. राज्यात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत ०.५ ते १ अंशाने अधिक नोंदविण्यात येईल. किमान तापमानात सरासरी ०.५ ते १ अंश एवढी वाढ नोंदविण्यात येईल. 

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा