कर्णधार स्टिव स्मिथ आणि रियान पराग यांनी केलेल्या आश्वासक खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर ५ गडी राखून मात केली आहे. मुंबईने दिलेलं १६२ धावांचं आव्हान राजस्थानने सहज पूर्ण केलं. मुंबईच्या गोलंदाजांचा नेटाने सामना करत स्टिव स्मिथने अर्धशतक झळकावलं.