पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी २६३ गुन्ह्यात ८४६ जणांवर कारवाई

कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ६६ हजार ६६९ पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच ५ लाख ९१ हजार४९६ व्यक्तींना कॉरंटाईन (Quarantine) करण्यात आले आहे.

पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी २६३ गुन्ह्यात ८४६ जणांवर कारवाई
SHARES
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात ठिक ठिकाणी नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई केली. माञ अनेक ठिकाणी बेजबाबदार नागरिकांकडून माञ पोलिसांवरच हल्ला केल्याच्या घटना घडल्या, अशा बेजबाबदारांविरोधात पोलिसांनी राज्यात २६३ गुन्हे नोंदवले असून ८४६ जणांवर आतापर्यंत कारवाई केली आहे.

त्याच बरोबर कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी  ४ लाख ६६ हजार ६६९ पास  पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच ५ लाख ९१ हजार४९६ व्यक्तींना कॉरंटाईन (Quarantine) करण्यात आले आहे.अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात  लॉकडाऊनच्या म्हणजे २२ मार्च ते ८ जून  या कालावधीत  कलम १८८ नुसार  १,२४,१०३ गुन्हे नोंद झाले असून २३,९२५ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ६ कोटी ७८ लाख ८१ हजार १९१ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

कडक कारवाई
 कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध  कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत. या दरम्यान पोलिसांवर  हल्ला होण्याच्या २६३ घटना घडल्या. त्यात ८४६ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

१०० नंबर-१ लाख फोन
 
पोलीस विभागाचा  १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो.       लॉकडाऊनच्या काळात या फोनवर  १,००,९५८फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली.  तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे अशा ७२२व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण ५,९१,४९६व्यक्ती Quarantine  आहेत. अशी माहिती गृहमंञी अनिल देशमुख यांनी दिली. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३३२ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ८४,५१७ वाहने जप्त करण्यात आली. तसेच परदेशी नागरिकांकडून  झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत. 

पोलिस कोरोना कक्ष
     
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने   मुंबईतील २० पोलीस व १ अधिकारी अशा एकूण २१, पुणे २, सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण ३, ए.टी.एस. १, मुंबई रेल्वे १, ठाणे ग्रामीण २, जळगाव ग्रामीण १ अशा ३४ पोलिस वीरांना आपला जीव गमवावा लागला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. सध्या २०२ पोलीस अधिकारी व १२८६ पोलीस कोरोना  बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

रिलिफ कँम्प
राज्यात सध्या एकूण २८६ रिलिफ कँम्प आहेत. त्या ठिकाणी जवळपास १३,१८८ लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा