'सोशल मिडिया'वर महाराष्ट्र पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी सेलिब्रिटिंकडून अनोखा उपक्रम


'सोशल मिडिया'वर महाराष्ट्र पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी सेलिब्रिटिंकडून अनोखा उपक्रम
SHARES
महाराष्ट्रात कोरोना या महामारीने हाहाकार माजवला असताना, नागरिकांच्या ऱक्षणासाठी सदैव तत्पर असलेले महाराष्ट्र पोलिस 24 तास सेवा देत आहे. या परिस्थितीत त्याचे मनोबल वाढवण्यासाठा गृहमंञी  अनिल देशमुख यांनी महाराष्ट्र पोलिसांचा लोगो सोशल मिडियाच्या प्रोफाइवर ठेवण्याचे आवाहन केले. देशमुखांच्या या आवाहनाला सर्व सामान्यांपासून ते सेलिब्रिटीसह राजकारण्यांनी ही प्रतिसाद दिला आहे.



राज्यात कोरोनाचे संकट असतानाही खचून न जाता ठिक ठिकाणि पोलिस 24 तास जनतेच्या रक्षणासाठी तत्पर आहे. अनेकदा पोलिसांवरच हल्याच्या घटना घडत आहेत. तर आतापर्यंत राज्यातील 1007 पोलिस कर्मचाऱ्यांना या महामारीची लागण झाली आहे.तर सात पोलिस बांधवांचे निधन झाले आहे. या सारख्या घटना कानावर पडून ही ते खचून न जाता नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात आहे. अशा परिस्थित त्याचे मनोबल वाढवण्यासाठी गृहमंञी अनिल देशमुख यांनी सोशल मिडियावरील प्रोफाइलवर पोलिसांचा लोगो ठेवून 'आम्ही ही तुम्हच्या सोबत' असल्याचे आवाहन केले होते. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या  आवाहनास राज्यातील जनतेनी, मान्यवरांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे.शाहरुख खान, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, आनंद महिंद्रा,  सलमान खान, रणविर सिंग,  अक्षय कुमार, माधुरी दीक्षित,  अजय देवगण  यासारख्या दिग्गजांनी डीपीवर महाराष्ट्र पोलिसांचा लोगो ठेवला आहे.



   कुर्ला, विनोबा भावे नगर पोलिस स्टेशन मधील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल कलगुटकर यांचे कोरोनाने निधन झाले, त्यांना श्रद्धांजली वाहताना गृहमंत्र्यांनी सांगितले की, राज्यात आणखी सात  पोलीस बांधवांचे कोरोना मुळे निधन झालेले आहे . यासोबतच जवळपास 887 अधिकारी, पोलीस कोरोना बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्याचा हा अतिशय कठीण काळ असून, आपल्या कार्यक्षमतेच्या दुप्पट क्षमतेने पोलीस सर्वत्र कार्य करत आहेत. अशावेळी त्यांचे मनोबल वाढावे, आपण एकटेच आहोत असे त्यांना वाटू नये, सर्व समाज त्यांच्या सोबत आहे. हे त्यांना दाखवून देण्यासाठी मी  माझ्या समाज माध्यमांवर पोलिसांचा लोगो डी.पी. म्हणून ठेवणार आहे, असा लोगो आपण सर्वांनी ठेवून पोलिसांच्या कार्याची दखल घ्यावी. 
   
  आपले पोलीस दल हे कोणतेही संकट येवो, जिवाची पर्वा न करता जनतेच्या संरक्षणासाठी उभे असते. अगदी 26 -11 च्या अतिरेकी हल्ल्यात सुद्धा आपल्या जिवाची बाजी लावून महाराष्ट्र पोलीस दलाने राज्यातील जनतेचे संरक्षण केलेले आहे. अशाच प्रकारचे युद्ध आता या कोरोनाविरुद्ध आहे. त्यामुळे आपण सर्वांनी त्यांना साथ द्यावी. असे आवाहन केल्यानंतर लगेचच राज्यातील राजकीय क्षेत्रातील दिग्गज, मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज, क्रिडा क्षेत्रातील दिग्गज, उद्योग क्षेत्रातील दिग्गज, सामाजिक क्षेत्रातील मंडळी, विद्यार्थी व सामान्य नागरीक यांनी आपल्या सोशल मिडियाचा डी.पी. वर  महाराष्ट्र पोलिसांचा लोगो ठेवला. त्याबद्दल गृहमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत 

      आपल्या समाज माध्यमांवर डी.पी. म्हणून पोलीस दलाचा लोगो ज्यांनी ठेवला,  त्यात प्रामुख्याने शाहरुख खान, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, आनंद महिंद्रा,  सलमान खान, रणविर सिंग,  अक्षय कुमार, माधुरी दीक्षित,  अजय देवगण,  वरूण धवन,  सुनील शेट्टी, करण जोहर,  कतरिना कैफ, दिया मिर्झा  साजिद नडियादवाला,  गझल सम्राट तलत अजिज व पिनाज मसानी, फॅशन डिझायनर  नीता लुल्ला, कोरिओग्राफर  लुबना आदमास  यांचा सह अनेक क्षेत्रातील दिग्गज मंडळींचा समावेश आहे.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा