नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर 50 हजार गुन्हे दाखल, 10 हजार व्यक्तींना अटक


नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर 50 हजार गुन्हे दाखल, 10 हजार व्यक्तींना अटक
SHARES
 राज्यात सर्वत्र  सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात 22 मार्च 17 एप्रिल या कालावधीत राज्यात कलम 188 नुसार 49,756 गुन्हे दाखल झाले आहेत तर 10,276 व्यक्तींना अटक करण्यात आली असून 32,424 वाहने जप्त करण्यात आली आहेत, त्यामुळे घराबाहेर पडताना सर्व सामान्यांनी जरा विचार नक्कीच करा.

 कोरोनाच्या पार्श्वभूमिवर संपूर्णराज्य थांबलेलं आहे. राज्यात नागरिकांकडून प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत असतानाच, काही हुल्लडबाजांकडून नियम धाब्यावर बसवले जात आहेत. अशांना कायद्याचा धाक दाखवण्यासाठीच पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. राज्यभरात पोलीस विभागाच्या 100 नंबर वर 70, 307 फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. क्वारनटाईनलकरून ही समाजात बिनदिक्कत फिरणाऱ्या 555 जणांना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर याच काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1044 वाहनांवर गुन्हे दाखल केले आहे. तर टूरिस्ट व्हिजाच्या नावाखाली दिल्लीत जमलेल्या तबलिगी समाजाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावणाऱ्या नागरिकांकडून व्हिसा उलंघन केल्या प्रकरणी 15 गुन्हे राज्याभरात नोंदवले आहेत. या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी 1,82,76,744 (1 कोटी 82 लाख 76 हजार 744) रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.


7 अधिकारी व 23 पोलिसांना बाधा

  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अशा परिस्थितीत पोलीस अधिकारी कर्मचारी देखील 24 तास कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना दुर्देवाने सात पोलीस अधिकारी व 23 पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या 102 घटनांची नोंद  झाली असून  यात 162 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आले आहे.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा