देशात कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातले असून, याला आळा घालण्यासाठी सरकारने देशांत लॉकडाऊन घोषीत केला आहे. मात्र लॉकडाऊनचा आदेश धाब्यावर बसवून खुलेआम संचारकेल्याप्रकरणी राज्यभरात साडे दहा हजार गुन्हे दाखल करण्यात आले.याशिवाय समाज माध्यमांवर अफवा पसरवल्याप्रकरणी राज्यातील विविध सायबर पोलिसांनी 51 गुन्हे दाखल केले आहेत.
राज्यात आणि मुंबईत करोना हळूहळू हातपाय पसरू लागलेला असताना करोना आणि त्या संदर्भात सरकारकडून केल्या जाणाऱया उपाययोजनांसंदर्भात मोठ्या प्रमाणावर अफवांचे पीक सध्या उठले आहे. त्यामुळे आता राज्यातील सर्व सायबर पोलि समाजमाध्यमांवरील हालचालींवर लक्ष ठेऊन असून राज्यातील 51 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मुंबईतही अफवा पसरवल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
...
मुंबईत 1364 जणांवर गुन्हे
लॉक डाऊनच्या काळात नियम तोडल्याप्रकरणी मुंबई पोलिसंनी 1364 व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल केला आहेत. तर 1100 जणांना अटक केली आहे.166 जणांना नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. तर 97 जणांचा शोध सुरू आहे