काही दिवसांपूर्वी केंद्रानं दारू विकण्यास परवानगी दिली आणि दारूच्या दुकानांबाहेर मोठी गर्दी पाहायला मिळाली. यातून सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाला. हे लक्षात घेऊनच महाराष्ट्र सरकारनं यावर नामी उपाय शोधलाय. दारू घरपोच देण्यास विक्रेत्यांना परवानगी दिलीय. मात्र, यासाठी काही अटीही सरकारनं ठेवल्यात. मुंबई विदेशी मद्य नियम, 1953 अंतर्गत ज्या दारू विक्रेत्यांकडे परवाना आहे, तेच सरकारनं घालून दिलेल्या अटींच्या अधीन राहून दारू घरपोच देऊ शकतात.
15 मे पासून राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे मद्य परवान्यासाठी 90576 अर्ज आले होते. त्यातील 76655 परवान्यांना मंजूरी देण्यात आली. तर चालू महिन्यात एकूण 1 लाख 798 परवान्यांसाठी अर्ज आले असून त्यातील 92 हजार 612 अर्जदारांना परवाना देण्याबाबत परवानगी देण्यात आली आहे. तर
दिवसभरात 3 हजार 691 जणांनी मद्य परवान्यासाठी अर्ज केला असून 820 अर्जदारांना परवानगी दिल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे.
परवाना कुठे आणि कसा मिळवायचा
राज्यात 15 मे पासून घरपोच मद्यविक्री योजना अंमलात आली असून ग्राहकांना घरपोच मद्य विक्री सेवा देण्यात येत आहे. मद्य सेवन परवाने राज्य उत्पादन शुल्काच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. तथापी IOS प्रणलीबाबत संकेत स्थळावर अडचणी होत असल्याचे निर्देशनास आले आहे. या प्रणालीतील अडचणी दुर करण्यात येत आहेत तो पर्यन्त मद्यसेवन परवाना घेण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींच्या निर्देशनास आणण्यात येते की, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व निरीक्षक/दुय्यम निरीक्षक कार्यालये व अधीक्षकांच्या कार्यालयात दरोराज मद्य सेवन परवाने Offline पध्दतीने देण्याची सोय करण्यात आली आहे. सदर मद्य सेवन परवाने एक वर्षाकरीता रु.100/- किंवा आजीवन परवान्याकरीता रु.1,000/- एवढे शुल्क अदा करुन मिळू शकताता. तरी मद्य विक्री दुकानासमोर गर्दी न करता मद्य सेवन परवाने घेऊन मद्य घरपोच सेवेचा लाभ घेता येणार आहे.
अवैध तस्करी प्रकरणी गुन्हे दाखल
राज्यात 15 मे 2020 रोजी पासून ते आतापर्यंत तब्बल 3 लाख 83 हजार 383 ग्राहकांनी आँनलाईन मद्यखरेदी केली आहे. मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात एकूण 10,791 किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी 5,221 अनुज्ञप्ती सुरू आहेत. माञ तरी सुद्धा महाराष्ट्र राज्यात शेजारील राज्यांमधून अवैध मद्य तस्करी केली जात आहे. ही तस्करी रोखण्यासाठी सर्व विभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असुन 12 सीमा तपासणी नाक्यांवर विभागातील अधिकारी व कर्मचारी तैनात आहेत. 25 मे, 2020 रोजी राज्यात 69 गुन्हे नोंदविण्यात आले असून 23 आरोपींना अटक करण्यात आली आहे. रु.12 लाख किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर 24 मार्च, 2020 पासुन 25 मे, 2020 पर्यंत लॉकडाऊन काळात राज्यात एकूण 6332 गुन्हे नोंदविण्यात आले असून 2958 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच 626 वाहने जप्त करण्यात आली असून रु.17.01 /- कोटी किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
त्या अटी खालीलप्रमाणे-