लाॅकडाऊनच्या काळात कुठल्याही शाळांनी विद्यार्थ्यांच्या आगामी शैक्षणिक वर्षाच्या फी चे पैसे पालकांकडून मागू नयेत असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. तरीही काही शाळा फी मागत असल्याच्या तक्रारी पालकांकडून मिळत आहेत. त्यामुळे अशा शाळांवर कारवाई करण्याचे निर्देश राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सर्व जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहेत.
In the backdrop of Corona, the government decision has been issued regarding the demand of school fees from students and parents for schools in our state. If you have a complaint about this, please contact your District Education Officer (Primary / Secondary) office. pic.twitter.com/1D8LGr4yNa
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) April 17, 2020
यासंदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पालकांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात ३ मे पर्यंत संचारबंदी लागू आहे. मला सोशल मीडिया आणि फोनच्या माध्यमातून काही पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारी मिळाल्या आहेत की त्यांच्या शाळांकडून लाॅकडाऊन असूनही त्यांच्याकडे फी ची मागणी करत आहेत.
राज्यातील कोरोनाची आणि पालकांची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था आणि शाळांना (माध्यमिक/उच्च माध्यमिक) एक परिपत्रक पाठवण्यात आलं आहे. लाॅकडाऊनच्या काळात कुठल्याही विद्यार्थ्यांकडून फी ची मागणी करण्यात येऊन नये, असं परिपत्रकात स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांसाठी विद्यार्थी व पालकांना शालेय फी मागणी संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. याविषयी तक्रार असल्यास आपल्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्कसाधावा.@CMOMaharashtra @bb_thorat @AjitPawarSpeaks @SATAVRAJEEV @AUThackeray pic.twitter.com/tYY4O3eh5R
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) April 17, 2020
तरीही कुठल्या शाळेकडून फी ची मागणी होत असल्यास विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी आपल्या जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडे यासंबंधीची तक्रार नोंदवावी, असं त्यांना आवाहन करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हा शिक्षण अधिकारी संबंधित शैक्षणिक संस्था वा शाळांना परिपत्रकाचं पालन करण्याचे निर्देश देतील तसंच न ऐकणाऱ्या संस्थांवर कारवाई करण्यात येईल, असं गायकवाड यांनी स्पष्ट केलं.