अखेर दहावीचा निकाल लागला आहे. निकालानंतर विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याच्या तारखेत दहा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी सोमवार 20 जून ते बुधवार 29 जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक राहील.
विद्यार्थ्यांना गुणपडताळणी प्रति विषय 50 रुपये शुल्क आकारले जाईल. हे शुल्क ऑनलाईन पद्धतीने मंडळाकडे जमा करावे लागतील.
ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. यासाठी http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर सर्व माहिती अटी शर्ती आणि सूचना देण्यात आलेल्या आहेत. या प्रक्रियेसाठीचे शुल्क ऑनलाईन पध्दतीनेच भरावे लागेल.
महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परिक्षेसाठी यावर्षी महाराष्ट्रातून १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ८ लाख ८९ हजार ५८४ विद्यार्थी तर ७ लाख ४९ हजार ४८७ विद्यार्थीनींनी परीक्षा दिली आहे. उद्या हा निकाल लागणार असून बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे.
हेही वाचा