कलर्स मराठीवरील 'राधा प्रेम रंगी रंगली' ही मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहचली आहे. या मालिकेत काही दिवसांपूर्वी प्रेमच्या हातून घडलेल्या एका चुकीची शिक्षा राधाला भोगावी लागली. ज्यामध्ये अनेक निरुत्तरित प्रश्न आहेत, ज्याची उत्तरं लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत.
या मालिकेत येत्या भागात राधा परत सासरी येणार का? दीपिका तिच्या आणि प्रेमच्या लग्नाचे सत्य कळणार का? राधाच्या पत्रिकेतील दोषामुळे तिच्या जीवाला धोका निर्माण होणार का? माधुरीची या सगळ्यावर काय प्रतिक्रया असेल? देशमुखांची संपूर्ण संपत्ती राधाच्या नावावर झालेली आहे हे कळल्यावर प्रेम काय करेल? या सगळ्यामध्ये प्रेमला राधा प्रती आणि तिच्या कुटुंबाविषयी वाटणारी जबाबदारी तो कसा पूर्ण करेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मिळतील.