मुंबई - ऑक्टोबर हिटनंतर मुंबईत थंडीची चाहूल सुरू झाली आहे. हिवाळा सुरू झाला असून वाऱ्याचा वेग पूर्वेकडून उत्तरेकडे सरकत आहे. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात गारवा जाणवत आहे. हा हंगामी बदल असून यंदा फेब्रुवारीपर्यंत थंडी असणार असल्याची शक्यता कुलाबा वेध शाळेचे संचालक डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी वर्तवली.