नरिमन पॉईंट - समुद्रकिनाऱ्यालगतच्या गावांतील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अलिबाग ते मुंबई या दरम्यान बोट ॲम्ब्युलन्स सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केली आहे. कोकण विभागातील पनवेल, पाली, उरण, म्हसळा येथील रुग्णालयांच्या कामांबाबतचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आरोग्यमंत्र्यांच्या दालनात बैठकही झाली.