Advertisement

म्हाडाची लॉटरी 'इतकी' वर्षे लांबणीवर, जाणून घ्या कारण

मुंबईत घर खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

म्हाडाची लॉटरी 'इतकी' वर्षे लांबणीवर, जाणून घ्या कारण
SHARES

मुंबईत घर खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. म्हाडाने अलीकडेच मुंबई मंडाळासाठी ४ हजार घरांची सोडत जाहीर केली आहे. त्याचबरोबर कोकण बोर्डासाठी ऑक्टोबरमध्ये  लॉटरी काढण्याची तयारी म्हाडा करत आहे. मात्र, आता पुन्हा मुंबई मंडळाच्या लॉटरीसाठी नागरिकांना दोन वर्षे वाट पाहावी लागणार आहे. 

म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सद्यस्थितीत गोरेगावमध्ये म्हाडाच्या काही इमारती तयार होत आहेत. यात मध्यम वर्गासाठी 227 घरे तर उच्च वर्गासाठी 105 घरे तयार होत आहेत. त्याचबरोबर अन्य प्रोजेक्टमध्येही म्हाडाला काही घरे प्राप्त होणार आहेत. गोरेगावमध्ये होणाऱ्या प्रोजेक्टमध्ये घरे तयार होण्यास अद्याप दीड ते दोन वर्षांचा वेळ लागणार आहे. 

मागील आठवड्यात मुंबई बोर्डासाठी 4,082 घरांसाठी 1,45,849 लोकांनी रजिस्ट्रेशन केले होते. मात्र 4 हजार जणांचे घराचे स्वप्न साकार झाले आहे. त्यामुळं आगामी मुंबई मंडळाच्या लॉटरीत म्हाडा अधिक घरे देणार असल्याची शक्यता आहे.

मुंबईकरांना स्वस्त दरात घर उपलब्ध करुन देण्यासाठी म्हाडाला पहाडी गोरेगाव, बांगुर नगर आणि गोरेगाव पश्चिम येथे सरकारने 25 एकर जमीन दिली आहे. यातील 18 एकर जमीनीवरील बांधकाम केले जाणार आहे.

म्हाडा या 18 एकर जमिनीवर 5 हजार घरांचे बांधकाम करत आहे. यातील 5 हजार घरांपैकी म्हाडा आत्तापर्यंत फक्त 2 हजार घरे पूर्ण झाली आहेत. काही दिवसांपूर्वीच जारी झालेल्या सोडतीत या घरांचा समावेश करण्यात आला आहे.

मुंबईकरांना परवडणारी घरे देण्यासाठी म्हाडाला राज्य सरकारने पहाडी गोरेगाव, बांगूर नगर आणि गोरेगाव पश्चिम येथे २५ एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. यातील 18 एकर परिसरात बांधकाम करण्यात येणार आहे.

१८ एकरच्या या संकुलात म्हाडा ५ हजार घरे बांधत आहे. 5000 घरांपैकी म्हाडाला आतापर्यंत केवळ 2000 घरे पूर्ण करता आली आहेत. काही दिवसांपूर्वी निघालेल्या लॉटरीत यांचा समावेश करण्यात आला आहे. लोकांचे घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाने संपूर्ण 25 एकर परिसरात बांधकाम सुरू करण्याची गरज आहे.

लॉटरी काढण्यासाठी म्हाडाला हाऊसिंग स्टॉक आवश्यक आहे. काही वर्षांपासून म्हाडाला या दिशेने सातत्याने संघर्ष करावा लागत आहे. खासगी बांधकाम व्यावसायिकांनी घरांचा साठा अनिवार्य सरेंडर केल्यानंतर म्हाडाचा संघर्ष आणखी वाढला आहे. सोसायटी सदस्यांमधील परस्पर वादामुळे म्हाडाच्या बहुतांश वसाहतींमध्ये एकाच इमारतीचा पुनर्विकास केला जात आहे.

याशिवाय मुंबईत म्हाडाच्या जवळ असलेली जमीनींची बँकही कमी होत आहे. त्यामुळे म्हाडा मुंबईत एकही नवीन प्रकल्प सुरू करत नाही. लोकही पुनर्विकासासाठी म्हाडाऐवजी खासगी बिल्डरांना प्राधान्य देत आहेत. या आव्हानांमुळे लॉटरीसाठी घरे जमा करणे म्हाडाला अवघड होत आहे.



हेही वाचा

महारेरा सीसी-ओसी असलेल्या इमारतींना नोंदणी प्रमाणपत्र देणार

महारेरा सीसी-ओसी असलेल्या इमारतींना नोंदणी प्रमाणपत्र देणार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा