उद्योगधंद्यासह देशाच्या विकासातही योगदान देणाऱ्या टाटा उद्योगसमूहाच्या वतीनं ३०वी अांतरविभागीय कबड्डी स्पर्धा २३ मार्चपासून गुजरातमधील मिठापूर इथं अायोजित करण्यात अाली अाहे. या स्पर्धेत देशभरातील नामवंत कबड्डी संघ सहभागी होणार असून मुंबईतील तीन संघ अाणि तारापूरचा एक संघ असे चार संघ या स्पर्धेसाठी रवाना झाले अाहेत. टाटा समूहाने अातापर्यंत देशाला अनेक नामवंत कबड्डीपटू दिले अाहेत.
मुंबईतून व्होल्टास, टाटा पाॅवर अाणि टाटा सन्स हे तीन संघ तर तारापूरचा टाटा स्टील असे चार संघ या स्पर्धेसाठी सज्ज झाले अाहेत. एकूण अाठ संघाचा समावेश असलेल्या या स्पर्धेत बंगळुरू, जमशेदपूर, पुणे येथीलही संघ सहभागी होणार अाहेत. स्पर्धेचं उद्घाटन टाटा केमिकल्सचे उपाध्यक्ष भारतभूषण काठपलिया यांच्या हस्ते होणार अाहे.